Tuesday, May 19, 2009

रेस सेमी फायनलची...

आयपीएल टू मध्ये सेमीफायनलची रेस आता टिपेला पोहोचलीय. दिल्ली डेयरडेव्हिल्सनी हमसे आगे कोई नही म्हणत सेमीफायनलमधील स्थान आधीच पक्क केलंय तर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट स्पर्धेतनं केव्हाच बाहेर पडल्यायत. सेमी फायनलच्या तीन जागांसाठी आता पाच टीम्स मैदानात आहेत.

गतविजेते राजस्थान रॉयल्स यंदा मात्र आयपीएलची सेमी फायनल गाठण्यासाठी धडपडताना दिसतायत. शेन वॉर्नच्या या टीमनं यंदा १३ पॉइंट्सची कमाई केलीय आणि त्यांचा रनरेटेय - 0.360. त्यामुळं कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध तर त्यांना मोठा विजय मिळवावाच लागेल. पम सेमी फायनल गाठण्यासाठी राजस्थानला फक्त विजयच नाही तर नशीबाचीही साथ हवीय. काऱण चेन्नई आणि पंजाब आणि बँगलोर आणि हैदराबाद यांच्यातल्या निकालांवरही राजस्थानचं भविष्य अवलंबूनेय.

महेन्द्रसिंग धोनीचे चेन्नई सुपर किंग्ज सेमी फायनलच्या शर्यतीत सगळ्यात आघाडीवरेयत कारण सुपरकिंग्जनी आत्तापर्यंत 15 पॉइंट्सची कमाई केलीय आणि त्यांचा नेट रनरेटही बाकीच्या चार टीम्सपेक्षा जास्तंय. खरंतर फायनल फोरचं तिकिट कन्फर्म करण्यासाठी चेन्नईला अवघ्या एका विजयाची गरज होती. पण कोलकाता नाईट रायडर्सनी त्यांचा पराभव केल्यानं मोठंच वादळ उठलंय. त्यामुळं किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये चेन्नईला कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावाच लागेल. अर्थात पराभव झाला तरी नेट रनरेटच्या जोरावर सुपरकिंग्जची नौका तरून जाऊ शकते.

सुपरकिंग्जना आता आव्हान असणारेय किंग्ज इलेव्हन पंजाबचं. दोन्ही किंग्जच्या या लढतीत बरंच काही पणाला लागेल. प्रीतीच्या या टीमच्या खात्यात 14 पॉइंट्स आहेत पण त्यांचा रनरेट आहे -मायनस 0.423. जो रेसमधल्या बाकीच्या टीम्सपेक्षा कमीय. त्यामुळं पॉइंट्समध्ये टाय झाला तर कमी रनरेटमुळं पंजाबचं सेमी फायनलचं बर्थ हुकण्याची शक्यताय. त्यामुळं सेमी फायनल गाठायची असेल तर त्यांना चेन्नई विरुद्ध विजय मिळवावाच लागेल.

तर किंग्ज इलेव्हननी केलेल्या पराभवानं हैदराबादपुढंही संकट निर्माण झालंय. डेक्कन चार्जर्सच्या चार्जिंग बुलला आता चौखूर उधळावंच लागेल. चार्जर्सचा नेट रनरेटेय 0.265 , आणि त्यांच्या खात्यात 14 पॉइंट्सेत. पण सेमी फायनलमध्ये जागा पक्की करण्यासाठी गिली आणि कंपनीला विजय मिळवावाच लागेल. त्यामुळं आयपीएलच्या शेवटच्या लीग मॅचमध्ये बँगलोरवर डेक्कन जोरदार हल्ला चढवताना दिसतील.
थोडक्यात काय तर सेमी फायनलचं चित्र स्पष्ट होण्यासाठी शेवटच्या दिवसापर्यंत वाट पहावी लागणारेय.

Tuesday, May 12, 2009

Some times, even if you dont want to, you have to terminate certain things. and start afresh.

That's why I started this blog a year ago. but a lot has happened over he year and I just dint feel continuing this blog.. so I have decided to start a new one.

But from now on, This blog will be my place to write about books, films and stuff like that. Hope to write here again..