Monday, September 28, 2009
Although Thanks Is Not Enough! Free Flowers eCards, Greeting Cards from 123greetings.com
Shared via AddThis
Tuesday, May 19, 2009
रेस सेमी फायनलची...
गतविजेते राजस्थान रॉयल्स यंदा मात्र आयपीएलची सेमी फायनल गाठण्यासाठी धडपडताना दिसतायत. शेन वॉर्नच्या या टीमनं यंदा १३ पॉइंट्सची कमाई केलीय आणि त्यांचा रनरेटेय - 0.360. त्यामुळं कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध तर त्यांना मोठा विजय मिळवावाच लागेल. पम सेमी फायनल गाठण्यासाठी राजस्थानला फक्त विजयच नाही तर नशीबाचीही साथ हवीय. काऱण चेन्नई आणि पंजाब आणि बँगलोर आणि हैदराबाद यांच्यातल्या निकालांवरही राजस्थानचं भविष्य अवलंबूनेय.
महेन्द्रसिंग धोनीचे चेन्नई सुपर किंग्ज सेमी फायनलच्या शर्यतीत सगळ्यात आघाडीवरेयत कारण सुपरकिंग्जनी आत्तापर्यंत 15 पॉइंट्सची कमाई केलीय आणि त्यांचा नेट रनरेटही बाकीच्या चार टीम्सपेक्षा जास्तंय. खरंतर फायनल फोरचं तिकिट कन्फर्म करण्यासाठी चेन्नईला अवघ्या एका विजयाची गरज होती. पण कोलकाता नाईट रायडर्सनी त्यांचा पराभव केल्यानं मोठंच वादळ उठलंय. त्यामुळं किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये चेन्नईला कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावाच लागेल. अर्थात पराभव झाला तरी नेट रनरेटच्या जोरावर सुपरकिंग्जची नौका तरून जाऊ शकते.
सुपरकिंग्जना आता आव्हान असणारेय किंग्ज इलेव्हन पंजाबचं. दोन्ही किंग्जच्या या लढतीत बरंच काही पणाला लागेल. प्रीतीच्या या टीमच्या खात्यात 14 पॉइंट्स आहेत पण त्यांचा रनरेट आहे -मायनस 0.423. जो रेसमधल्या बाकीच्या टीम्सपेक्षा कमीय. त्यामुळं पॉइंट्समध्ये टाय झाला तर कमी रनरेटमुळं पंजाबचं सेमी फायनलचं बर्थ हुकण्याची शक्यताय. त्यामुळं सेमी फायनल गाठायची असेल तर त्यांना चेन्नई विरुद्ध विजय मिळवावाच लागेल.
तर किंग्ज इलेव्हननी केलेल्या पराभवानं हैदराबादपुढंही संकट निर्माण झालंय. डेक्कन चार्जर्सच्या चार्जिंग बुलला आता चौखूर उधळावंच लागेल. चार्जर्सचा नेट रनरेटेय 0.265 , आणि त्यांच्या खात्यात 14 पॉइंट्सेत. पण सेमी फायनलमध्ये जागा पक्की करण्यासाठी गिली आणि कंपनीला विजय मिळवावाच लागेल. त्यामुळं आयपीएलच्या शेवटच्या लीग मॅचमध्ये बँगलोरवर डेक्कन जोरदार हल्ला चढवताना दिसतील.
थोडक्यात काय तर सेमी फायनलचं चित्र स्पष्ट होण्यासाठी शेवटच्या दिवसापर्यंत वाट पहावी लागणारेय.
Tuesday, May 12, 2009
That's why I started this blog a year ago. but a lot has happened over he year and I just dint feel continuing this blog.. so I have decided to start a new one.
But from now on, This blog will be my place to write about books, films and stuff like that. Hope to write here again..
Friday, April 10, 2009
क्रिकेट ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड
Wednesday, April 8, 2009
मारिया मारिया
ऑगस्ट २००८ मध्ये शारापोव्हाचा खांदा दुखावल्यानं तिनं मॉन्ट्रियाल ओपनमधून माघार घेतली. त्यानंतर गेल्या आठ महिन्यांत शारापोव्हा एकही सिंगल्स मॅचमध्ये खेळलेली नाही. तिचं रँकिंगही आता तीसपर्यंत खाली घसरलंय...
महिला टेनिसमध्ये सध्या टॉप रँकिंगसाठी जबरदस्त स्पर्धा सुरूय. पण बँक बॅलन्सच्या बाबतीत तरी शारापोव्हाचं अव्वल स्थान कायमेय. शारापोव्हाची कमाई सुमारे तीस दशलक्ष यूएस डॉलर्सवर जाऊन पोहोचलीय आणि आठ महिने खेळापासून दूर राहूनही ती सर्वात श्रीमंत महिला क्रीडापटूय. शारापोव्हाच्या तुलनेत सेरेना विल्यम्सची कमाई साधारण निम्मी म्हणजे १५ दशलक्ष यूएस डॉलर्स तर व्हीनसची १३ दशलक्ष यूएस डॉलर्स इतकीय. तर खेळ आणि रुप दोन्हीमध्ये शारापोव्हाला टक्कर देणा-या क्यूट सर्ब अॅना इव्हानोविचच्या बँकमध्ये केवळ ६ ते ७ दशलक्ष यूएसडॉलर्स जमाएत.
सेरेना असो किंवा व्हीनस, अॅना असो किंवा येलेना, किंवा आणखी कोणी, मारिया की बात ही कुछ और है.. जगभर जाहीरातींमध्ये झळकणारा चेहरा... रोज किमान ६० लाख इंटरनेटवर सर्च हिट्स.. मोठमोठ्या कंपन्यांची मॉडेलिंग कॉन्ट्रॅक्ट्स आणि हे सारं काही वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी..
विशेष म्हणजे शारापोव्हाच्या खेळावर या अमाप प्रसिद्धीचा फारसा परिणाम झालेला नाहीय. २००४ मध्ये विम्बल्डन जिंकून शारापोव्हानं टेनिस विश्वात आपलं साम्राज्य निर्माण केलं. त्यानंतर एक फ्रेन्च ओपनचा अपवाद वगळता बाकी तीन्ही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्यात तिला यश आलंय.पण खांद्याच्या दुखापतीनं पुन्हा पुन्हा डोकं वर काढल्यानं शारापोव्हाला टेनिसपासून काही काळ दूर राहिलीय. म्हणूनच तिचे चाहते तिची वाट पाहतायत..
लवकरच ती परत येणारेय...गेल्या महिन्यांत इंडियाना वेल्स स्पर्धेत शारापोव्हा एका डबल्स मॅचमध्ये खेळली. मात्र सिंगल्सपासून ती अजून महिनाभर तरी दूर राहणारेय.. त्यानंतर टेनिसची ही ग्लॅमगर्ल फॅशननगरी पॅरिसमध्ये पुन्हा टेनिसकोर्टवर आपले जलवे दाखवताना दिसेल अशीच अपेक्षाय.
जान्हवी मुळे
Tuesday, March 3, 2009
आजवर क्रिकेटच्या मैदानातून राजकारणाचे डावपेच अनेकदा खेळले गेलेयत. पण एखाद्या अतिरेकी संघटनेनं क्रिकेटपटूंवरच थेट सशस्त्र हल्ला करण्यची ही पहिलीच वेळ आहे. त्यातही ही घटना पाकिस्तानसारख्या क्रिकेटवेड्या देशात व्हावी ह्यासारखं दुर्दैव नाही.
खेळाची मैदानं आणि खेळाडू दहशतवाद्यांसाठीही सॉफ्ट टारगेट बनत चालले आहेत. खेळाडूंवर, स्टेडियमवर हल्ला केला म्हणजे सगळ्या जगाचं लक्ष वेधलं जाणार याची हल्लेखोरांना खात्री असते. त्याचाच फायदा उठवण्याचा प्रयत्न आजवर अनेक अतिरेकी संघटनांनी केलाय. खेळांच्या इतिहासतल्या अशाच काही रक्तरंजित घटनांचा हा एक आढावा:
1) म्युनिक हत्याकांड १९७२ – ऑलिम्पिक मध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या इस्राएलच्या ११ खेळाडूंचं ‘ब्लॅक सप्टेंबर’ या पॅलेस्टिनी अतिरेकी संघटनेकडून अपहरण आणि हत्या.
ऑलिम्पिक म्हणजे जागतिक शांतता आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य यांचं प्रतीक. पण १९७२च्या म्युनिक ऑलिम्पिकदरम्यान जे घडलं त्यातून सावरायला जगाला बराच वेळ लागला होता. ऑलिम्पिक म्हणजे दुस-या महायुद्धातून उभं राहणा-या जर्मनीसाठी आपली प्रगतीच्या दिशेनं चाललेली वाटचाल जगापुढे आणण्याची मोठी संधी होती. पण जगाच्या इतिहासात म्युनिक ऑलिम्पिकची नोंद वेगळ्याच कारणासाठी व्हायची होती.
५ सप्टेंबर १९७२ रोजी पहाटे अतिरेकी संघटना ब्लॅक सप्टेंबरच्या आठ सदस्यांनी म्युनिक ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये इस्राएली खेळाडूंच्या डॉर्मिटरीत शस्त्रास्त्रांसह गुपचूप प्रवेश केला. हल्लेखोरांनी दोन इस्राएलींना ठार केलं तर इतर नऊ जणांना ओलिस ठेवलं. खेळाडूंच्या बदल्यात इस्राएलच्या ताब्यातील २००हून अधिक पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करण्यची मागणी अपहरणकर्त्यांनी केली. जर्मन सरकारबरोबर दिवसभर असफल वाटाघाटी केल्यावर अपहरणकर्त्यांनी ओलिसांसह जर्मनीबाहेर जाण्याची मागणी केली. मात्र विमानतळावर जर्मन स्नायपर्सबरोबर झालेल्या चकमकीत सर्व नऊ खेळाडूंबरोबरच पाच अतिरेकी मृत्यूमुखी पडले.
म्युनिक ऑलिम्पिकपूर्वी ऑलिम्पिक व्हिलेज म्हणजे उत्सवाचा मांडव असायचा. १९७२ नंतर प्रत्येक ऑलिम्पिकच्या वेळी ऑलिम्पिक व्हिलेजला लष्करी तळाचं रुप प्राप्त झालेल दिसलं.
एरवी ‘मध्यपूर्वेतली राष्ट्रं पाहून घेतील, हा त्यांचा प्रश्नंय’ अशीच बहुतांशी युरोपियन राष्ट्रांची पश्चिम आशियातल्या अस्थिरतेवरची भूमिका असे. पण म्युनिकनंतर हे सगळं बदललं. पॅलेस्टाईन आणि इस्राएलमधला वाद त्यामुळं आंतरराष्ट्रीय समुदायापुढचा कळीचा मुद्दा बनला.
‘ब्लॅक सप्टेंबर’च्या त्या यशामुळं इतर अतिरेकी संघटनांनाही हिंसाचाराचा एक सोपा मार्ग दिसून आला आणि खेळांची मैदानंही सुरक्षित राहणार नाहीत ह्याची जगाला जाणीव झाली.
२) १९८७ - सेऊल ऑलिम्पिक तोंडावर आलेलं असताना, कोरियन एअरलाईन्सचं एक विमान ब्रह्मदेशाच्या हवाई हद्दीत झालेल्या स्फोटात नष्ट झालं. ही घटना म्हणजे अपघात नसून ऑलिम्पिकच्या तयारीवर परिणाम घडवण्याचा उत्तर कोरियन अतिरेक्यांचा प्रयत्न होता असा दावा दक्षिण कोरियाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष चुन हुआन यांनी केला.
३) १९९२ – इटीए या स्पॅनिश फुटीरतावादी गटानं बार्सेलोना ऑलिम्पिकदरम्यान हल्ला करणार असल्याची धमकी दिली. मात्र कोणताही घातपात झाला नाही, त्यामुळं आयोजकांनी सुटकेचा निश्वास टाकला.
४) १९९६ – २७ जुलैच्या सकाळी अटलांटा इथं ऑलिम्पिक सेंटेनियल पार्कजवळ एका पाईपबॉम्बच्या स्फोटात एक मृत्युमुखी आणि १०० जखमी. अमेरिकेतील एका अंतर्गत अतिरेकी गटाचा सदस्य एरिक रॉबर्ट रुडॉल्फला हल्ल्यासाठी दोषी मानण्यात आलं.
५) २००३ – अथेन्स ऑलिम्पिकची तयारी सुरू असतानाच २२ जून रोजी ग्रीसच्या अधिका-यांनी प्लॅतियाली या लहानशा बंदराजवळ एक जहाज ताब्यात घेतलं. जहाजावरून तब्बल ७५० टन स्फोटकं जप्त करण्यात आली.
६) ५ मे २००४ – अथेन्सच्या एका उपनगरात पोलिस स्टेशनबाहेर ३ बॉम्बस्फोट. ‘रिव्होल्युशनरी स्ट्रगल’ या ग्रीक अतिरेकी संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली, तसंच ऑलिम्पिकदरम्यान घातपात करण्याचा इरादा जाहीर केला.
Monday, February 2, 2009
बॅटल इज स्टिल ऑन!
“People are trapped in history and history is trapped in them.”– James Baldwin

पण माझ्या कायम लक्षात राहतील ते हा सामना संपल्यानंतरचे काही क्षण. प्राईझ डिस्ट्रिब्युशनच्यावेळी बोलताना भावनावेगानं फेडररचं अडखळणं, चाहत्यांमधून आलेल्या ‘We still love you Roger’च्या आरोळ्या आणि अखेर टेनिसच्या महानायकाच्या डोळ्यातून ओघळलेले अश्रू..
होय. फेडरर रडला. एखाद्या लहान मुलासारखं निरागसपणे त्यानं आपल्या भावनांना वाट करून दिली. पण ते अश्रू पराभवाचे किंवा त्यामुळं झालेल्या निराशेचे नव्हते. तर स्वतःच्या चुकांमुळं जेतेपदाची संधी गमावल्याची खंत त्याला डाचत होती. आणि या परिस्थितीतही आपल्या चाहत्यांनी आपली साथ सोडलेली नाहीय, हे त्याला कळत होतं.Wednesday, December 31, 2008
Time to start again
"Good resolutions are simply checks that men draw on a bank
where they have no account."- Oscar Wilde
Wednesday, December 10, 2008
Cricket: Can it provide the Healing Touch?
मैं कुर्सी पे बैठके खबरे दिए जा रही थी,
क्यों ना कुछ और कर पा रही थी...?
(I was sitting on a Chair and giving news, why was I not doing anything else?)
Nidhi Kulpati, NDTV's Anchor, once said these lines in a programme. And these were my exact feelings during all the mayhem that happened in Mumbai.
I work for Sports Department of a Mumbai based Marathi News Channel. Normally, I talk of overs bowled, shots played, points and goals scored, records being taken over. But for those three- four days, and a few days after that, I was speaking of grenades, guns, gunmen and guards.
Every person in our channel was working on only one news and its different angles- the terror attack on Mumbai. I was not an exception. In fact, War, Defense and International Relations are the subjects of my interest since school days ( of course, along with Sports- which is a war in a different sense).So I was constantly following all the updates coming from battle ground and from arround the world. I was working for our website and we all in the office and on ground worked for hours during that period.
And, in those times, for the first time in my professional career, I felt how unimportant things like Sports can be at such times. But then, my conscious reminded me, of wonders Sports can do at such times.
Yes, I believe Sports have the ability to do wonders to our world. It brings people together and reduce the tension on person to person level. More than all, a sport teaches us to learn from the defeat and move on in our life.
That is the reason why the world was anxiously waiting for England's Cricket Team's decision. Finally, they made it—for whatever reasons—and Test Series is starting from tomorrow.
Their decision to continue with the tour is seen by many as a decision taken to keep the financial interests. May be economy was a factor, but surely, it's a brave step. And I hope Indian team too, takes a brave step and go and play in Pakistan—at least on a short trip.
Cricket was never so important like it has become now. True that you can not fight a real world problem on a cricket pitch. To do that, affirmative actions are reqired from the authorities. But Cricket do give you the patience and hope and it takes care that the intensity and impact of worldly problems will be reduced.
How ironical! People had got horrified to see the onslaught on Mumbai, But they'll get positively inspired to see the onslaught on Cricket field.
I always believed, When the work of Armed Forces finishes, work of Sportsmen, Musicians and people alike begins. And the time has come for Cricket to prove it's worth again, and time has come for us to tell why this game is so worthy.
Whatever may happen, We shall keep doing the task in our hand. Nothing shall stop us.
Anxiously waiting for the match to begin...
Thursday, November 27, 2008
What Else Can You Say?
1993 नंतर भारतात झालेले मोठे दहशतवादी हल्ले
1. 12 मार्च 1993, मुंबई
दुपारी १.३० ते ३.४० या कालात मुंबईत 12 ठिकाणी 13 बॉम्बस्फोट. बॉम्बस्फोटांच्या या मालिकेत 257 जणांनी जीव गमावला तर 700 जण जखमी झाले. या हल्ल्यांमागे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम चा हात होता.
कोईंबतूरमध्ये ११ ठिकाणी झालेल्या १३ बॉम्बस्फोटांत ४६ मृत्यृमुखी आणि २०० जखमी
जम्मू आणि काश्मीर विधानसभा परिसरात सशस्त्र अतिरेक्यांचा हल्ला. ३५ जण मृत्युमुखी. हल्ल्यामागे इस्लामिक दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा हात.
भारतीय लोकशाहीचं प्रतिक असलेल्या संसदभवनावर सशस्त्र अतिरेक्यांचा हल्ला. 12 जण मृत्युमुखी तर १८ जण जखमी. जगभरातून हल्ल्याचा मोठ्या प्रमाणावर निषेध. हल्ल्यामागे पाकिस्तानी दहशतवादी संघटनांचा हात असल्याचं स्पष्ट झालं, दोन्ही देशांमधील संबंधांत तणाव वाढला.
अक्षरधाम मंदिरावरील हल्ल्यात 31 जणांचा मृत्यू तर 79 जण जखमी.
जम्मूजवळ सैन्यदलाच्या तळावर सशस्त्र अतिरेक्यांचा हल्ला, 30हून अधिक जणांचा मृत्यू.
7. डिसेंबर 2002 ते मे 2003, मुंबई
या आठ महिन्यांच्या काळात मुंबई चार वेळा बॉम्बस्फोटांनी हादरली. मुंबईला हादरवणा-या या स्फोटांमागे स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया अर्थात सिमीचा हात असल्याचा आरोप.
2 डिसेंबर 2002 - घाटकोपर रेल्वे स्टेशनबाहेर बेस्ट बसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला तर 31 जण जखमी.
6 डिसेंबर 2002 - मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर मॅकडोनाल्ड्सच्या रेस्टॉरंटमध्ये बॉम्बस्फोट. 25जणांना जखमी करणारा हा बॉम्ब रेस्ट़ॉरंटच्या एऱकंडिशनिंग सिस्टिममध्ये ठेवण्यात आला होता.
27 जानेवारी 2003 - विलेपार्ले स्टेशनबाहेर संध्याकाळी गर्दीच्या वेळी सायकल बॉम्बचा स्फोट, एका महिलेचा मृत्यू तर 30जण जखमी.
13 मार्च 2003 - मुलुंड रेल्वेस्थानकात कर्जत लोकलमध्ये बॉम्बस्फोट. संध्याकाळी साडेआठच्या सुमारास अत्यंत गर्दीच्या वेळी झालेल्या या स्फोटानं ११ प्रवाशांनी आपला जीव गमावला. मुंबईची जीवनवाहिनी असणा-या लोकल ट्रेनला पहिल्यांदाच लक्ष्य करण्यात आलं.
8. २५ ऑगस्ट 2003, मुंबई
दुपारच्या वेळी गेट वे ऑफ इंडिया आणि झवेरी बाजार इथं टॅक्सीत बॉम्बस्फोट. किमान 52 जण मृत्युमुखी तर 150 जण जखमी. पहिला बॉम्बस्फोट गेट वे ऑफ इंडिया समोरील ताज महाल हॉटेलच्या बाहेर पार्क केलेल्या टॅक्सीत झाला. तर दुसरा बॉम्बस्फोट झवेरी बाजारात मुंबादेवी मंदिर परिसरात झाला.
9. 15 ऑगस्ट 2004, आसाम
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी धेमाजी इथं झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये 16 जम मृत्युमुखी. जखमी आणि मरण पावलेल्यांमध्ये लहान मुलांचा मोठा समावेश.
10. 5 जुलै 2005, अयोध्या
रामजन्मभूमी परिसरात सशस्त्र अतिरेक्यांचा हल्ला.
11. 29 ऑक्टोबर 2005, दिल्ली
दक्षिण दिल्लीमध्ये बाजार परिसरात तीन बॉम्बस्फोट. दिवाळीच्या दिवशी झालेल्या या बॉम्बस्फोटांमध्ये 59 जण मृत्युमुखी तर 200 जखमी. पाकिस्तानस्थित इस्लामिक इन्कलाब माहेझ या अतिरेकी संघटनेनं हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली.
12. 7 मार्च 2006
उत्तर प्रदेशातील वाराणसी या तीर्थक्षेत्री बॉम्बस्फोट, 28 मृत्युमुखी तर 101 जखमी. हल्ल्यामागे पाकिस्तानशी निगडीत दहशतवादी संघटनांचा हात असल्याचा भारतीय पोलिसांचा दावा.
13. 11 जुलै 2006, मुंबई
पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेन्समध्ये सात बॉम्बस्फोट. संध्याकाळी गर्दीच्या वेळी झालेल्या या स्फोटांमध्ये 200 जणांनी आपला जीव गमावला. हाही हल्ला म्हणजे पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांचं कारस्थान असल्याचं तपासात उघड.
14. 8 सप्टेंबर 2006, मालेगाव
मालेगावमध्ये मस्जिद परिसरात बॉम्बस्फोटांची मालिका. 37 मृत्युमुखी तर 125 जखमी. जखमींमध्ये अनेक मुस्लिम यात्रेकरूंचा समावेश.
15. 18 मे 2007, हैदराबाद
मक्का मस्जिद इथं शुक्रवारच्या नमाजच्या वेळी बॉम्बस्फोट. १३ जण मृत्युमुखी. बॉम्बस्फोटांनंतर झालेल्या दंगलींमध्ये पोलिसांच्या कारवाईत 4 जणांचा मृत्यू.
16. 26 मे 2007, आसाम
गुवाहाटीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू तर 30 जण जखमी.
17. 10 जून 2007, मणिपूर
म्यानमारच्या सीमेजवळील मोरेह इथं सशस्त्र अतिरेक्यांचा गोळीबार, ११ जण मृत्युमुखी.
18. 25 ऑगस्ट 2007, हैदराबाद
लुंबिनी पार्क आणि गोकुळ चाट भवन इथं बॉम्बस्फोट, 42 जणांचा मृत्यू तर 50 जण जखमी. या दोन्ही बॉम्बस्फोटांमागे हरकत-उल-जिहाद-इ-इस्लामी अर्थात हुजीचा हात होता.
19. 23 नोव्हेंबर 2007
उत्तर प्रदेशात सहा बॉम्बस्फोटांची मालिका. वाराणसी, फैजाबाद आणि लखनौ या तीन शहरांना लक्ष्य बनवण्यात आलं. वाराणसीत तीन ठिकाणी, फैजाबादमध्ये दोन तर लखनौमध्ये एक बॉ़म्बस्फोट, 13 जणांनी जीव गमावला तर 60 जण
20. 13 मे 2008, जयपूर
परदेशी पर्यटकांचं आकर्षण असलेल्या या शहरात सहा बॉम्बस्फोट झाले. या बॉम्बस्फोटांच्या मालिकेत 63 जणांचा मृत्यू आणि 150हून अधिक जण जखमी.
21. 25 जुलै 2008, बंगळूर
भारतीय आयटी उद्योगाचं मोठं केंद्र असलेलं बंगळूर एरवी शांत शहर म्हणून प्रसिद्ध आहे. पण चार महिन्यांपूर्वी इथं झालेल्या सात बॉम्बस्फोटांच्या मालिकेनंतर भारतात कोणतही शहर सुरक्षित नसल्याचंच दिसून आलं. या बॉम्बस्फोटांमध्ये एकाचा मृत्यू झाला तर 150 हून अधिक जण जखमी झाले.
22. 26 जुलै 2008, अहमदाबाद
बंगळूरनंतर अवघ्या एका दिवसात आणखी एक भारतीय शहर दहशतवाद्यांच्या हल्ल्याची शिकार बनलं. या हल्ल्यात 45 जण जखमी झाले तर 150हून अधिक जण जखमी झाले. इंडियन मुजाहिद्दीन या अतिरेकी संघटनेनं अहमदाबादमधील या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.
23. 13 सप्टेंबर 2008, नवी दिल्ली
बाजार परिसरात पाच ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये 21 जणांचा मृत्यू झाला तर 100 जण जखमी झाले. इंडियन मुजाहिदीन संघटनेनं याही हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.
बाजार परिसरात झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू.
भाऊबीजेच्या दिवशी पश्चिम आसाममध्ये गुवाहाटी आणि आसपासच्या परिसरात 13 बॉम्बस्फोट. 61 जणांचा मृत्यू तर 300 जण जखमी.
26. 26 नोव्हेंबर 2008, मुंबई
देशाची आर्थिक राजधानी पुन्हा एकदा अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर. एके 47 रायफल्स आणि ग्रेनेड्सनं सज्ज सशस्त्र अतिरेक्यांचा मुंबईवर हल्ला. दक्षिण मुंबईत विविध ठिकाणी अंदाधुंद गोळीबार, ताज महाल आणि ओबेरॉय (ट्राय़डेन्ट) या फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये अतिरेक्यांनी परदेशी नागरिकांना ओलीस धरलं.
A Few months back, my Canadian Friend Emil had said this of Mumbai. I had never thought that it will come true in such a manner … Mumbai is “Total Chaos” since last evening, and there is no sign of 'liveliness’ around…
I went to CST station in the morning, and noticed that life is getting back on track, but tracks are changed, ofcourse…
Wednesday, November 26, 2008
War on the Streets Mumbai
I’m afraid, that this is not going to end soon. I feel it’s not an attack, it’s a War. And it has reached to our doorsteps.
It’s not a serial bomb blast and it’s aftermath. This is a war on streets. Something that ‘normally’ happens in Baghdad or Kabul or Jerusalem or Shrinagar, Something that we ‘often’ witnessed on television, has suddenly become a surreal actuality.
I can’t take my eyes off the television. I’m searching through websites. I tried to call my colleagues who’re in the field. But then I don’t know what I’m going to speak.
The terrible thing is that I’m totally blank, just living in real time- keeping an eye on what is happening and trying to recollect, trying to process this information.
Only one thing that I know is that I’m going to have a sleepless night.
Thursday, November 13, 2008
innocence on street
This is what is meant by childhood... but sadly I got to see it in a wrong place.
On Mulund station, where all people are running to get on with the world these children had quietly living in their own world.. the world of their dreams, which is beyond our comprehension.
And all who were not asleep, seem to ignore that these chledren even exist.. Who cares for a bunch of flesh and cloths on the side of a road?
And, it's Children's Day tomorrow...
Wednesday, November 5, 2008
An Old Dream and New Challanges
"If there is anyone out there who still doubts that America is a place where all things are possible; who still wonders if the dream of our founders is alive in our time; who still questions the power of our democracy, tonight is your answer."- Barack Obama in his victory address.
Yes, This might be THE answer... To all the questions that time has put in front of mankind. At least we can hope it to be so. Because, the world's only Superpower has got a new leader. Because, as expected, Obama is the New President Elect of The United States of America.
This is one of those rarest of the rare moments when not just a Nation, but whole of the world stretches its arms to welcome the future, when everyone is filled with immense hope, when everyone is reminded of the responsibilities that lie ahead... This is one of those moments when a person's victory stands for the victory of a community, for the victory of a Nation and for the victory of the ideals of Democracy, Freedom, Equality and Brotherhood.
Today, USA- a country marred by history of violence over the colour of skin, a community with deep socio-religious differences, has chosen a new leader- someone who perhaps best signifies what the spirit of their nation stands for. The World's most powerful nation has now elected a President who comes from a biracial background, was raised by a single mother, grew up in Hawaii and Indonesia. Obama has won his first battle without great family connections, without a trust fund. He started out with intellect, talent and ambition and to fulfill that ambition, he built up a great coalition. He made a clever use of the power of new media, i.e. Internet to reachout to people and gather their support. A lot of young Americans left their apathy for politics and joined him on the campaign trail. And today they are all celebrating. They are all singing for a new dawn.
And this can happen only in America- a place where in a way of speaking, most of the people are outsiders. Most of the people of America have their roots in the early residents who immigrated in search of a better life or were imported as slaves. Over the Years, The USA has been a symbol of liberation. The land has been a beacon of hope and dream. Its founders hold a dream and today, that dream has taken a step forward towards reality.
The world has just witnessed a great history in the making. America has shown that they are ready for THE change. No, I shall say, THE Change has begun.
And Obama's speech, can be a signal of this change. The thing I liked about it is that he didn't described it as a victory of the suppressed race or those who fought for Civil Rights, but as a Victory of the People of America. He thanked those who voted for him and showed respect to those who didn't. and by that tone of his, he has surely won the hearts of many of his enemies as well.
For Obama, the race to the White House has ended but a long journey will officially start on the 20th January next year, when he'll be sworn in as The 44th President of The USA. And then, he has got a legacy of problems. Obama has to deal with " two wars, a planet in peril, the worst financial crisis in a century " as he describes himself.
Whatever... I liked this CHANGE.
In his first address as the new leader of the United States, Obama has shown a great promise. Whether he keeps up to it, time will show.
But for now, Obama's speech for me is the accomplishment of An Old Dream and an insight of the New Challenges that lie ahead.
Monday, November 3, 2008
Stage set for The Big American Drama - This time in Search of A Dream
But really, Obama or Mc cain - how far does it matter? Or does it really matters? To some extent, yes. But in a greater context, not much. Because, as any Foreign Policy Expert would tell you, in today’s world, policies are more or less constant and personalities can influence them but they cannot turn the upside down.
Still, for next several hours (and may be for next several days or even for months, if another scandal leaps up) the whole world will be desperate to know who steps into the White House.
Because, The Man (yes, the MAN, not WOMAN as I had dreamt a year ago) will have the power to write the destinies of thousands of people around the world, whether or not he uses it for better, is a different issue. Whoever wins this battle, will have the power to change the World, the power that he can use to create a better world or to take us all down.
As a citizen of the World’s largest Democracy, I’m excited to know who leads the eldest Democracy of Modern World. I’m excited to know what plans he has for his country that has an upshot on the world economy, which is virtually in a crisis. So I want to know if Obama or Mc Cain have a plan and a will to act on that plan to improve the condition of US Markets and thereby perk up the Economy of the world.
Sunday, October 26, 2008
समस्यांच्या विळख्यात क्रिकेट
त्याआधी बँगलोर टेस्टमध्येही चित्र काही फारसं वेगळं नव्हतं..
गेला काही काळ क्रिकेट सामन्यांदरम्यान स्टेडियममध्ये प्रेक्षकांपेक्षा रिकाम्या खुर्च्यच जास्त दिसताहेत. आणि याच गोष्टीमुळं इंटरनॅशनल क्रिकेट कौंसिलही चिंतेत पडलंय. आयसीसी सीइओ हरून लॉर्गट यांनी मोहली भेटीदरम्यान आपली ही चिंता बोलूनही दाखवली होती.
भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशात ऑस्ट्रेलियासारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्यांशी सामना होत असताना स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या उपस्थितीत घट झालीय. लोक स्टेडियममध्ये जाण्यापेक्षा टेलिव्हिजनवर सामने बघणं पसंत करतायत. आजकाल तर मॅचदरम्यान टीव्ही ऑन केला जातो, तोही केवळ स्कोअर पाहण्यापुरताच. त्यामुळं फक्त टेस्टचंच नाही क्रिकेटच्या खेळाचंच भवितव्य धोक्यात येऊ शकतं..
हा सगळा ट्वेन्टी 20चा परिणाम असं कुणीही सहज म्हणेल. पण क्रिकेटपुढच्या या समस्येची कारणं तेवढ्यापुरतीच मर्यादीत नाहीत. बदलत्या काळाइतकीच आयसीसीची चुकलेली धोरणं आणि न घेतले गेलेले निर्णयही क्रिकेटच्या या परिस्थितीला जबाबदार आहेत.
खरंतर एलिटिस्टस् स्पोर्ट, जंटलमेन्स गेम अशी क्रिकेटची ओळख. पण आज हा खेळ आपल्या या मुखवट्याच्याच कोषात अडकून पडल्यासारखा वाटतोय. आजही केवळ दहा देशांनाच टेस्ट क्रिकेटचा दर्जा मिळवता आलाय. त्यातही केवळ निम्मे संघ सध्या सुस्थितीत आहेत.
क्रिकेटची जन्मभूमी असलेल्या इंग्लंडमध्ये क्रिकेटला जिवंत ठेवण्यासाठी ट्वेन्टी 20चं इंजेक्शन द्यावं लागलं. पण त्यानंतरचं चित्रही फारसं आशादायी नाही. क्रिकेटला इथं स्पर्धा करावी लागतेय फूटबॉलसारख्या लोकप्रिय आणि well organized खेळाची.
एकेकाळी क्रिकेटवर राज्य करणा-या वेस्ट इंडिजचं साम्राज्य केव्हाच कोसळलंय. मैदानात भल्याभल्यांना धडकी भरवणारे वेस्ट इंडिजचे स्टार्स अस्ताला गेले आणि कॅरिबियन क्रिकेटची भट्टी पुन्हा जमलीच नाही. ब्रायन लाराच्या निवृत्तीनंतर तर वेस्ट इंडिजकडे एकही ताकदवान गडी उरलेला नाहीय. एक स्टॅनफर्ड लीगचा अपवाद सोडला तर कॅरिबियन क्रिकेटला संजीवनी देण्याचे प्रयत्न फारसे होताना दिसत नाहीत. अर्थात ही लीगही खेळापेक्षा पैशाला समोर ठेवून आखल्यासारखी वाटते.
क्रिकेटवर सध्या वर्चस्व गाजवणा-या ऑस्ट्रेलियालाही उतरती कळा लागलीय. कांगारूंचा आधार असलेले अनेक मोहरे आता निवृत्तीच्या मार्गावर आहेत. आणि ह्या टीमचा प्रवासही वेस्ट इंडिजच्या वाटेनं होण्याची भीती क्रिकेटवर्तुळात व्यक्त केली जातेय.
श्रीलंका आणि भारतीय क्रिकेटपुढेही हीच समस्या उभी आहे.
तर दुसरीकडे टेस्टचा दर्जा मिळून आठ वर्ष झाली तरी बांगलादेश क्रिकेट जगतात रांगायलाही शिकलेला नाहीय.
राजकीय संघर्ष आणि दहशतवादानंही क्रिकेटपुढची आव्हानं आणखी वाढवली आहेत. दक्षिण आफ्रिकेनं वर्णभेदावर मात करून ऑस्ट्रेलियाला टक्कर देण्याची हिम्मत तर दाखवली, पण तिथलं क्रिकेटही आता कोटा सिस्टिमचे चटके सहन करतंय. झिम्बाब्वे क्रिकेटची तिथल्या राजकीय अस्थिरता आणि हुकुमशाही राजवटीमुळं साफ वाताहात लागलीय. झिम्बाब्वेनं २००५नंतर एकही टेस्ट सामना खेळलेला नाही. तर पाकिस्तानलाही 2008मध्ये एकही टेस्ट सामना खेळता आलेला नाही. सुरक्षिततेचं कारण पुढे करत अनेक देशांनी पाकिस्तानकडे पाठ फिरवलीय.
न्यूझीलंडसारख्या देशांतील क्रिकेट बोर्डांना आर्थिक समस्याही भेडसावतायत. आणि म्हणूनच तिथल्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा इंडियन क्रिकेट लीगसारख्या स्पर्धांना जवळ केलंय. क्रिकेटपुढच्या समस्यांचा हाही एक वेगळा पैलूय.
आयसीएल आणि बीसीसीआयमधल्या युद्धाचाही क्रिकेटला मोठा फटका बसलाय. भारतातील अनेक युवा खेळाडूंनी आयसीएलची वाट धरलीय. या सगळ्या खेळाडूंना बीसीसीआयनं दूर केल्यानं देशांतर्गत क्रिकेट मात्र आणखी दुबळं होऊ शकतं.
आयसीसीच्या अनेक सहसंलग्न देशांमध्ये तर देशांतर्गत क्रिकेटची अवस्था आधीच चिंताजनक आहे. तर २००३च्या विश्वचषकात सेमीफायनल गाठण्याचा पराक्रम करणा-या केनियात क्लब क्रिकेटचाही विकास होऊ शकला नाहीय.
चांगल्या खेळाडूंच्या अभावामुळं मजबूत टीम्स निर्माण होऊ शकलेल्या नाहीत आणि क्रिकेटमधली स्पर्धाही मर्यादीत राहिलीय. ही परिस्थिती जैसे थे राहिली तर प्रेक्षकांचा या खेळातला रस आणखी कमी होऊ शकतो, जे क्रिकेटला परवडणारं नाही.
क्रिकेटला या संकटातून वाचवणं कठीणही नाही. पण त्यासाठी काही ठोस पावलं उचलावी लागतील.
१. तिकिटांच्या किमतीत घट केल्यास सर्वसामान्य क्रिकेट चाहत्यांनाही स्टेडियममध्ये सामन्याचा आनंद लुटता येईल.
२. स्टेडियम्समध्ये प्रेक्षकांच्या सोयी सुविधांची काळजी घेणंही तितकंच आवश्यक आहे.
३. क्रिकेट सामन्यांचं वेळापत्रक आखताना आणखी विचार होणं गरजेचंय. एरवी सारखंच भारत आणि ऑस्ट्रेलियामधले सामने पाहणं कोणाला आवडेल ?
४. हे वेळापत्रक आखताना टेस्ट, वन डे आणि ट्वेन्टी २० सामन्यांमध्ये समतोल साधणंही आवश्यक
४. अधूनमधून हॉलंड, कॅनडा, यांसारख्या सहसदस्य देशांमध्ये मोठ्या संघांचे सामने खेळवल्यास क्रिकेटच्या प्रसारात मदत होईल.
५. पण केवळ सामने भरवून चालणार नाही, तर इतर देशांतील खेळाडू घडवण्यासाठी ठोस पावलं उचलणं आवश्यक.
- जान्हवी मुळे
Tuesday, October 7, 2008
Dada Retires..
'NANO' chali Gujrathma?
Thursday, October 2, 2008
Are Philosophies going dead?
Gandhi's b'day to be world's non-violence day



